Posts

Showing posts from April, 2015

इंटरनेट @१९९९

Image
Net Neutralityचा विषय चव्हाट्यावर आला आणि इंटरनेट रांगत असतानाचे दिवस आठवले. २०व्या शतकाची शेवटची २-३ वर्ष आणि २१व्या शतकाची पहिली २-३ वर्ष म्हणजे साधारण १९९९-२००२ च्या आसपासचा काळ. जमाना Dial-upचाच होता. VSNLचं नेट कनेक्ट करायला घेतलं की 'Status : Dialing' असं मॉनिटरवर दाखवत तो एक्सटर्नल मोडेम नामक रातकिडा "टिक् टिर्रर्रर्रर्रऽऽऽ" करत डायल करायला सुरुवात करायचा. VSNL हे सरकारी काम असल्यामुळे दोन मिनिटं तरी थांबावं लागायचंच ! Connect करायचे अनेक नंबर्स असले तरी सरकारी नियमां(!)प्रमाणे त्यातला एकच नंबर चालायचा. तो नंबर "टीं टीं टीं टीं टीं" केकाटत डायल व्हायचा. त्यानंतर परत त्या मोडेमच्या अंगात रातकिडा आणि जोडीला घुबड शिरून "टींऽऽऽ रूंऽऽऽ खर्रर्रर्रर्र टीं टूं टक् खर्रर्रर्र" असे भयंकर आवाज येऊन मॉनिटरवर 'Verifying username and password' असा मेसेज् दिसायचा. हा मेसेज् दिसला म्हणजे बाबा आणि मी इंडिया जिंकल्याची दुर्मिळ (त्यावेळी तेही दुर्मिळच होतं !) घटना घडल्यासारखे क्षण दोन क्षणांची दिवाळी साजरी करत असू, कारण असा मेसेज् येणं हे खरंच ...

'आमचे ग्रहण अजून(ही) सुटलेले नाही'

Image
शाळेत मराठीच्या पुस्तकात (९वी/१०वी) समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा एक धडा होता याच नावाचा, 'आमचे ग्रहण अजून सुटलेले नाही'. साधारण १२५ वर्षांपूर्वीचं निबंधलेखन असावं. त्यात भारतीय समाजातल्या अंधश्रद्धांवर कडाडून टीका केलेली होती. आगरकरांनी त्यात ग्रहणकाळात 'सचैल स्नान' करायच्या प्रथेबद्दल लिहिलं होतं. ज्योतिषशास्त्राबद्दलही लिहिलं होतं. आज Whatsappवर ग्रहणकाळात काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल एका messageमध्येही न पुरणारा भलामोठा message सकाळी सकाळी आला. मलमूत्र विसर्जन करू नये, अन्नपाणी ग्रहण करू नये, शिवणकाम करू नये, तेल लावू नये, स्नान करावे, जप करावे, दानधर्म करावा, अमुक केलं तर हा रोग होईल, तमुक केलं तर तो रोग होईल. हे केलं तर या नरकात जाल, ते केलं तर त्या नरकात जाल असं बरंच काही लिहिलं होतं कुठल्या कुठल्या पुराणांचे हवाले देऊन. असा मेसेज बघून बहुतेक Whatsappही वैतागलं असावं. कारण शेवटी 'Message too long, truncated by Whatsapp' असं आलं होतं. Message वाचून अक्षरशः कपाळावर हात मारला. "तो चंद्र बिचारा सतत सूर्याचा दा...